पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"मराठी भाषा दिन आणि भाषाभ्रम"....

इमेज
    "मराठी भाषा दिन आणि भाषाभ्रम..."   सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांची आजच वाचण्यात आलेली एक सुंदर कविता आपल्या मराठी भाषेची  आपल्या सोबतची नाळ जोडते ती अशी...           "अलवार कधी तलवार कधी,             पैठणी सुबक नऊवार कधी..             जणू कस्तुरीचा दरवळ दैवी,             ती सप्तसुरावर स्वार कधी..             डोलत फडकते रायगडी,             नाचते कधी ती भीमेकाठी..            ही माझी माय मराठी.                   १९९९ मध्ये विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षें झाली.  वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. इत:पर हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे. भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील गोष्टी आहेत. इंग्र