"गड आला पण सिंह गेला": डॉ. नरेंद्र दाभोलकर


            या देशाला महाराष्ट्राने फार अनमोल रत्न दिलीत.त्या अनमोल रत्नानीच या देशाला ,या महाराष्ट्राला आकार ,उकार दिला.त्या अनेक रत्नापैकी एक कोहिनूर होता तो म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर .
भाषणाची सुरवात कार्ल मार्क्स च्या "धर्म ही अफूची गोळी आहे".असे करून श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांचा सविस्तर पाढा सादर करत.
           अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी डॉ. नरेंद्र दाभोलकर सर्वात धाकटे अपत्यं.डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्‍यातील  न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. पूढे सांगली येथील “विलिंग्डन महाविद्यालया”तून त्यांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यावर डॉ. दाभोलकरांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
दाभोलकर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाविश्वात सुविख्यात होते. कबड्डी व या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती देणारे पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डी या क्रीडा प्रकारात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र सरकारच्या मानाचा “शिवछत्रपती पुरस्कार” व “शिवछत्रपती युवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले होते.
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे समाजिककार्यासाठीचे योगदान हे अमूल्य आहे. त्यांनी अंधश्रध्देच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. बाबा आढाव यांच्या “एक गाव-एक पाणवठा” या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतरच्या काळात श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या “अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती” साठी कार्य सुरू केले. त्यानंतर म्हणजे १९८९ मध्ये अ.भा.अं.नि.स पासून वेगळे होऊन दाभोलकरांनी “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती”ची स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढींचं उच्चाटन करण्याण्यासाठी व्याख्यान व सभांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकरांनी अनेक वर्षे कार्य केले होते. यासाठी ते सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांची फसवेगिरी दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रयोग व प्रात्यक्षिक दाखवून लोकांसमोर उघडकीला आणले होते.
              अंधश्रध्देच्या समूळ उच्चाटन व्हावे व त्याविषयीचे आपले विचार सर्वांना माहिती व्हावे या उद्देशाने डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी या विषयाशी संबंधित अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये “अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम”, “ अंधश्रद्धा विनाशाय ”, ऐसे कैसे झाले भोंदू” , “ झपाटले ते जाणतेपण ” , “ ठरलं… डोळस व्हायचंय ” , “ तिमिरातुनी तेजाकडे ”, “ प्रश्न मनाचे , “ भ्रम आणि निरास ” , “ विचार तर कराल? ” , “ मती भानामती ” ,“ विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी ”, “ श्रद्धा-अंधश्रद्ध ” अश्या वाचनीय पुस्तकांचा समावेश आहे. तसंच साने गुरुजींनी स्थापन केलेल्या “साधना” या साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६ पासून २०१३ पर्यंत संपादक होते.
अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा संपादन करा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.
आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे.समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्देविरोधासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सरकारी तसंच संस्थांनी त्यांना गौरविले होते. यामध्ये “रोटरी क्लब चा समाजगौरव पुरस्कार”, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ला दिला गेला होता. तसंच “पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार” व भारत सरकार तर्फे दिला जाणारा “पद्मश्री किताब” डॉ. दाभोलकरांना मरणोत्तेर प्रदान करण्यात आला होता.
पण आज दाभोलकर सरांची हत्या करून 7 वर्षे होत आली तरी या देशाला त्यांचे मारेकरी सापडत नाही हेच त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल.डॉ. दाभोलकर यांच्यानंतर कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या या एकाच विचारसरणीच्या बुरसटलेल्या लोकांकडून झालेल्या आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारतात सिरिया-इराक-पाकिस्तानसारखी परिस्थिती आपल्याकडे आली आहे हे कबूल करावे लागते. डॉ. दाभोलकर हे धर्माच्या विरोधात लढले नाहीत किंवा धर्मसंस्था मोडीत काढावी हा विचार त्यांनी मांडला नाही. ते धर्मातल्या अंधश्रद्धांच्या विरोधात लढले, विज्ञानवादी दृष्टिकोन व विवेकाला जागृत करण्यासाठी ते सतत काम करत राहिले. त्यांचे काम आपल्या समाजात मुळाशी जात नसेल तर ती आपलीच हार असेल.

अमोल भोसले.
20 ऑगस्ट 2020

टिप्पण्या

  1. अगदी विचारपूर्वक लेख . छान लेख व भाषा सुसंगत

    उत्तर द्याहटवा
  2. छान आहे लेख शीर्षक उत्तम दिलया साहेब

    उत्तर द्याहटवा
  3. अंध श्रद्धा च्या विषाणु चां ईलाज करणारे डॉक्टर... दाभोलकर याना अभिवादन🙏🙏🙏...
    डॉक्टरांचं जीवनपट डोळ्यांसमोर उभा केल्याबदल अमोल भोसले साहेब तुमचे आभार....

    उत्तर द्याहटवा
  4. एकदम विस्तृतपणे, स्पष्ट, आणि उत्तम लेखनाचा नमुना म्हणजे हा लेख... एकदम भारी सर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"