पोस्ट्स

"केरळा स्टोरी " : सत्य कि अजेंडा....?

इमेज
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ करणारं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सहजसोपं नाही. मात्र सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहेत.  ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ने निर्माण केलेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन राजकीय तसेच धार्मिक मतभेद निर्माण करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात एक तेढ निर्माण करणारा चित्रपट आहे. एक अनुभव हा चित्रपट सामान्य लोकांच्या मनावर किती खोलवर परिणाम करतो हे मला सांगून गेला. तसं पाहायला गेलं तर ही फार किरकोळ गोष्ट आहे, पण ‘द केरला स्टोरी’मुळे याच छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच माझ्यासाठी पुरेसा आहे. धर्म, जात वगैरे सगळं

THE AI (Artificial Intelligence ) & ChatGPT Challenge....

इमेज
 THE AI (Artificial Intelligence ) & ChatGPT Challenge.... "ChatGPT foregrounds need for innovation in education and regulation. Gap between technology and policy needs closing." Since at least 2015 - when kalus schwab popularised the term "Fourth Industrial Revolution " at that year world's Economic Forum - terms like 4IR..Artificial Intelligence(AI), Internet of Things, Future for Work, entered the lexicon of politicians, bureaucrats, consultants and policy analyst. With the launch of open AI's ChatGPT late last year (30 November 2022),the impending changes in the nature of work, creativity and economy as a whole have moved from being the subject of futuristic jargon to an immediate challenge. The transformations the new technology is bound to bring about must be met with swift adjustments in the broader national and policy that was seen with the rise of Big Data and social media can serve as a lesson.   Sample some development

"संस्कार चारित्र्य घडवतात..."

       आपली प्रत्येक कृती ही तलावाच्या पृष्ठभागावर आंदोलीत होणाऱ्या तरांगसारखी असते. आपल्या प्रत्येक क्रियेने चित्तसरोवरावर जणू एक तरंग येऊन जात असतो. हे तरंग विरून गेल्यावर काय उरते? संस्कार...! असे अनेक संस्कार मनावर पडले म्हणजे ते एक होतात आणि ती माणसाची " सवय  " बनतात. ' सवय हा माणसाचा दुसरा स्वभावच होय '( Habit is second nature of Human) असे म्हणण्याचा प्रघात आहे. केवळ दुसराच नव्हे, तर सवय हा माणसाचा प्रधान स्वभाव आहे. नव्हे,तर तो पुरा स्वभाव आहे असं म्हणता येईल. आपला आजचा पुरा स्वभाव हा आपल्या सवयी चे फळ आहे. ही वस्तुतिथी तुम्हां आम्हाला केवढा तरी दिलासा देते. कारण आमचा स्वभाव जर केवळ आमच्याच सवयीनी बनलेला असेल, तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो ; तसे करणे आपल्याचं हाती असते. आमच्या मनामध्ये हे जे तरंग वा लाटा उठत असतात, त्यांचा प्रत्येकाचा परिणाम म्हणून एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या या चिन्हालाच " संस्कार " म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिंन्हाची, म्हणजे संस्काराची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणू

कर्मवीर भाऊराव......

इमेज
                               घरी पाहुणे आलेले असतात.जेवण चालू असते. जेवताना पाहुणे विचारतात मुलगा काय करतो. वडील म्हणतात, "काही नाही खातो पितो गावभर फिरतो ". हे सर्व ऐकत असते जेवण वाढणारी मुलाची बायको.अन वाढताना तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागते... त्यातील दोन अश्रू त्या मुलाच्या ताटात नकळत पडतात. तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो अन घराबाहेर पडतो... तोच मुलगा बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाचे रान करतो अन "आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था उभारतो".अन त्या मुलाचे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. #वि. स. खांडेकर म्हणाले होते की "स्त्री चे अश्रू हे  अणुबॉम्ब पेक्षा भयानक अन विध्वसंक असतात". पण कर्मवीर आण्णाच्या पत्नीच्या आसवाने तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.प्रसंगी या माऊलीने गळ्यातील डोरलं मोडलं.पोरांना जेवू घातलं पण शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. ती आज अखेर...  सध्याच्या सोकोल्ड युगात 'क' कमळाचा नसून "कर्मवीर" भाऊराव पाटील यांचा शिकवण्याची गरज आहे. कर्मवीर हे दलित बांधवांचे,गरीब गरजू कुटुंबाचे,अनाथांचे पा

किंमत...

             किंमत.....                                 खरंतर हा तीन अक्षरी शब्द माणसाला प्रत्येक गोष्टीत जाणीव करून देत असते यासाठी एक उदाहरण पाहू.....     "एक श्रीमंत माणूस एकदा नदी काठावरील एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळात शिरणार तेव्हढ्यात त्यांच्या मनांत आले की समोर नदीचे पात्र आहे त्यात स्नान करून ओलेत्यानी शंकराची पूजा करावी. म्हणून ते चालत नदीकाठाशी आले. काठावर हातपाय धूत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले. त्यांना पोहता येत नव्हते. ते ओरडायला लागले. काठावर अनेक लोक होते पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येईना. शेवटी काठावर संध्या करीत असलेल्या एका साधूने हा आरडाओरडा ऐकला. तो साधू धावत त्या काठाजवळ आला. त्याने त्या माणसाला बुडताना पाहिले आणि क्षणार्धात पाण्यात उडी मारली. बुडणार्‍या त्याला धरून काठावर ओढत आणले. आणि त्याचा जीव वाचविला. थोडावेळाने तो श्रीमंत माणूस शुद्धीवर आला. ह्या साधूने आपला जीव वाचविला हे समजताच त्याने खिशात हात घालून नोटांची गठ्ठी बाहेर काढली आणि त्यातील एक रुपयाची नोट साधूच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवली. हे पाहून आसपासचे लोक

🇮🇳 भारत @75 वर्षे....🇮🇳

इमेज
              भारत @75 वर्षे .....    "हम अपनी जान के दुष्मन को  अपनी जान  कहते है... मोहब्बत  की  इसी मिट्टटी को हिंदुस्तान  कहते   है  |                                भारतीय घटनेच्या  प्रस्तावनेतील  सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही हे  3  शब्द वाचकांच्या  कायम  लक्षात  राहतील.  ही आधुनिक प्रजासत्ताकाची गुणवैशिष्ट्ये  आहेत. अशा  प्रजासत्ताकाची स्थापना  करण्यासाठी  आपण लढा दिला  आणि  आजच्या तारखेला  बरोबर  75 वर्षे  मागे  म्हणजे    15 ऑगस्ट  1947  रोजी  भारताला  स्वातंत्र्य  मिळाले.                           शतकानुशतके  पारतंत्र्यात असणाऱ्या या देशाचे  बहुतेक भाग सार्वभौम  होते..राज्य  सार्वभौम  होते...पण जनता  सार्वभौम  नव्हती .पण आज  आपल्या   या 130 कोटी  लोकसंख्येच्या  देशाने  लोकशाही  , सार्वभौमत्व ,आणि  प्रत्येक  अधिकार  आपल्या  गुणसूत्रामध्ये सामावून, मुरवून घेतला आहे. गेल्या 75 वर्षाच्या प्रवासातील   हे आपले सर्वात मोठे यश आहे. राजेरजवाडयांच्या नंतर  आलेल्या  इंग्रजांच्या  अधिपत्याखाली  त्यापूर्वी ची   काही  हजार वर्षे  घालवलेली  गुलामी जनता  पूर्वीच्य

राजकारणातील पाली.....

इमेज
राजकारणातील पाली....       राज्यात गेल्या महिन्यात नुकतच झालेलं बहुपात्री राजकीय नाटकं घडून सत्तांतर झालं.सत्तांतर आणि त्यापाठोपाठ सरकारवरील विश्वासदर्शक ठरवाकरिता झालेल्या विधानसभाअधिवेशनात सर्व काही प्रयोग झाले.त्यात कोण ,कुठे,कधी जातो हा सस्पेन्स होता, मुंबईतुन सुरत व्हाया गुवाहाटी ला पोहचनाऱ्याचं थ्रिल होतं, तरीही निष्ठावान असल्याचा ड्रॅमा होता,वेष बदलून रात्री घेतलेल्या गुप्त भेटीगाठी होत्या,विधिमंडळ च्या भाषणामध्ये राग दिसत होता,द्वेष होता,कोपरखळ्या होत्या,एकमेकांना केलेल्या रानटी गुदगुल्या होत्या ,माझे कसे सगळेच मित्र आहेत हे सांगणे होतं... सर्व काही आलबेल होत.नव्हता फक्त आपल्या सारख्या सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न!                विधांनसभेतल्या प्रत्येक निवड केलेल्या कलाकारांची भाषण ऐकतांना महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या कानाला अटॅक आला असेल हे नाकारता येत नाही.ते ऐकून हे  जाणवत होतं की महाराष्ट्राचे 12 कोटी नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा दुरदूरचा ही आता संबंध उरलेला नसून,अवघ राज्य फक्त ह्या  सत्तेच्या सारीपाटा वर लिलावात निघाल