पोस्ट्स

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

इमेज
महाराष्ट्र ही संताची, राष्ट्रनायकांची, क्रांतिवीरांची, सामाजिक  झटणा-ऱ्या सुधारकांची आणि मानवतेच्या मूल्यांची स्थापना करण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची, विचारवंताची भूमी राहिलेली आहे. याच भूमीमध्ये प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली, विकसित झाली, प्रसरण पावली आणि अधोगामी विचारधाराही निपजली. प्रत्येक वेळी प्रागतिक विचारधारेची सरशीच झाली असे नव्हे; परंतु महाराष्ट्रातील जनतेने प्रागतिक विचारांना बळ देण्याचे काम केले. इतिहासाच्या पानापानांवर गर्दी करून राहिलेल्या घटनांमध्ये, सुवर्णाक्षरांनी नोंदवाव्यात अशा काही व्यक्ती व घटना आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचे एकजीव असे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला.आणि या आधुनिक महाराष्ट्राला सुंदर राजमहाल ज्या अनेक क्रांतिकारक कार्यातून झाला;  त्या अनेक शिल्पकारांपैकी एक  महत्त्वाचे नाव म्हणजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज होत. छत्रपती राजर्षी शाहूंनी ज्या काही समाजपरिवर्तनाच्या चळवळी बांधल्या, विकसित केल्या; किंबहुना त्यांना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक बळ दिले, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. रा...

मैत्री....

इमेज
आज मैत्री दिन त्यानिमित्ताने थोडंसं....      आज या विषयावर लिहताना मला  मित्र कोणाला म्हणायचे यावर पु. लं. देशपांडे यांचे सुंदर उत्तर मिळते ते म्हणतात, "ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावेसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच."         तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी म्हणून येणाऱ्या व्यक्ती मुळे तुम्ही घडू पण शकतात आणि बिघडू पण शकतात ..तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी म्हणून येणारी व्यक्ती का ? कशी ? व कोणत्या करणासत्व आली हे मित्र या संकल्पनेला समजण्यासाठी फार महत्वाचे ठरते .. फक्त काही भेटी गाठी झाल्या व त्या भेटीत ओळखी झाल्या ... की आपण त्या ओळखीना लगेच मैत्री हे नाव देतो ... पण सरसकट कोणत्याही व्यक्ती आपल...

"Yoga and Health"

इमेज
                 "Your body exists in the past and your mind exists in the future.In yoga, they come together in present."                            - B.K.S.Iyengar              ‘Yoga’ this term has its origin in a Sanskrit word- ‘Yoke’ which eventually defines yoga as a process of connecting yourself to God, the spiritual Self. Maharishi Patanjali is renowned and known as the father of Yoga. We also have a company running on his name. Yoga has its roots in India and it never fails to fascinate people far off this land. Tourists, travellers who visit India are intrigued by the idea of Yoga. The benefits and the idea of yoga are enchanting and attractive. Everyone aspires to be fit, happy and at peace, and the entire human race wants it. Yoga is the journey of discovering the self. It is an ancient and beautiful practice of Ind...

"केरळा स्टोरी " : सत्य कि अजेंडा....?

इमेज
दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ करणारं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सहजसोपं नाही. मात्र सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहेत.  ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ने निर्माण केलेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन राजकीय तसेच धार्मिक मतभेद निर्माण करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात एक तेढ निर्माण करणारा चित्रपट आहे. एक अनुभव हा चित्रपट सामान्य लोकांच्या मनावर किती खोलवर परिणाम करतो हे मला सांगून गेला. तसं पाहायला गेलं तर ही फार किरकोळ गोष्ट आहे, पण ‘द केरला स्टोरी’मुळे याच छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच माझ्यासाठी पुरेसा आहे. धर्म, जात वगैरे ...

THE AI (Artificial Intelligence ) & ChatGPT Challenge....

इमेज
 THE AI (Artificial Intelligence ) & ChatGPT Challenge.... "ChatGPT foregrounds need for innovation in education and regulation. Gap between technology and policy needs closing." Since at least 2015 - when kalus schwab popularised the term "Fourth Industrial Revolution " at that year world's Economic Forum - terms like 4IR..Artificial Intelligence(AI), Internet of Things, Future for Work, entered the lexicon of politicians, bureaucrats, consultants and policy analyst. With the launch of open AI's ChatGPT late last year (30 November 2022),the impending changes in the nature of work, creativity and economy as a whole have moved from being the subject of futuristic jargon to an immediate challenge. The transformations the new technology is bound to bring about must be met with swift adjustments in the broader national and policy that was seen with the rise of Big Data and social media can serve as a lesson.   Sample some development...

"संस्कार चारित्र्य घडवतात..."

       आपली प्रत्येक कृती ही तलावाच्या पृष्ठभागावर आंदोलीत होणाऱ्या तरांगसारखी असते. आपल्या प्रत्येक क्रियेने चित्तसरोवरावर जणू एक तरंग येऊन जात असतो. हे तरंग विरून गेल्यावर काय उरते? संस्कार...! असे अनेक संस्कार मनावर पडले म्हणजे ते एक होतात आणि ती माणसाची " सवय  " बनतात. ' सवय हा माणसाचा दुसरा स्वभावच होय '( Habit is second nature of Human) असे म्हणण्याचा प्रघात आहे. केवळ दुसराच नव्हे, तर सवय हा माणसाचा प्रधान स्वभाव आहे. नव्हे,तर तो पुरा स्वभाव आहे असं म्हणता येईल. आपला आजचा पुरा स्वभाव हा आपल्या सवयी चे फळ आहे. ही वस्तुतिथी तुम्हां आम्हाला केवढा तरी दिलासा देते. कारण आमचा स्वभाव जर केवळ आमच्याच सवयीनी बनलेला असेल, तर आपण तो केव्हाही बदलून टाकू शकतो ; तसे करणे आपल्याचं हाती असते. आमच्या मनामध्ये हे जे तरंग वा लाटा उठत असतात, त्यांचा प्रत्येकाचा परिणाम म्हणून एक एक चिन्ह मागे राहून जात असते. मागे राहिलेल्या या चिन्हालाच " संस्कार " म्हणतात. आपले चारित्र्य म्हणजे या सगळ्या चिंन्हाची, म्हणजे संस्काराची गोळाबेरीज होय. जो विशिष्ट प्रवाह वरचढ ठरतो तसा एकूण माणू...

कर्मवीर भाऊराव......

इमेज
                               घरी पाहुणे आलेले असतात.जेवण चालू असते. जेवताना पाहुणे विचारतात मुलगा काय करतो. वडील म्हणतात, "काही नाही खातो पितो गावभर फिरतो ". हे सर्व ऐकत असते जेवण वाढणारी मुलाची बायको.अन वाढताना तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागते... त्यातील दोन अश्रू त्या मुलाच्या ताटात नकळत पडतात. तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो अन घराबाहेर पडतो... तोच मुलगा बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जीवाचे रान करतो अन "आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था उभारतो".अन त्या मुलाचे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. #वि. स. खांडेकर म्हणाले होते की "स्त्री चे अश्रू हे  अणुबॉम्ब पेक्षा भयानक अन विध्वसंक असतात". पण कर्मवीर आण्णाच्या पत्नीच्या आसवाने तर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली.प्रसंगी या माऊलीने गळ्यातील डोरलं मोडलं.पोरांना जेवू घातलं पण शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. ती आज अखेर...  सध्याच्या सोकोल्ड युगात 'क' कमळाचा नसून "कर्मवीर" भाऊराव पाटील यांचा शिकवण्याची गरज आहे. कर्मवीर हे दलित ...

किंमत...

             किंमत.....                                 खरंतर हा तीन अक्षरी शब्द माणसाला प्रत्येक गोष्टीत जाणीव करून देत असते यासाठी एक उदाहरण पाहू.....     "एक श्रीमंत माणूस एकदा नदी काठावरील एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळात शिरणार तेव्हढ्यात त्यांच्या मनांत आले की समोर नदीचे पात्र आहे त्यात स्नान करून ओलेत्यानी शंकराची पूजा करावी. म्हणून ते चालत नदीकाठाशी आले. काठावर हातपाय धूत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदीपात्रात पडले. त्यांना पोहता येत नव्हते. ते ओरडायला लागले. काठावर अनेक लोक होते पण त्यांना वाचविण्यासाठी कोणी पुढे येईना. शेवटी काठावर संध्या करीत असलेल्या एका साधूने हा आरडाओरडा ऐकला. तो साधू धावत त्या काठाजवळ आला. त्याने त्या माणसाला बुडताना पाहिले आणि क्षणार्धात पाण्यात उडी मारली. बुडणार्‍या त्याला धरून काठावर ओढत आणले. आणि त्याचा जीव वाचविला. थोडावेळाने तो श्रीमंत माणूस शुद्धीवर आला. ह्या साधूने आपला जीव वाचविला हे समजताच त्याने खिशात ह...

🇮🇳 भारत @75 वर्षे....🇮🇳

इमेज
              भारत @75 वर्षे .....    "हम अपनी जान के दुष्मन को  अपनी जान  कहते है... मोहब्बत  की  इसी मिट्टटी को हिंदुस्तान  कहते   है  |                                भारतीय घटनेच्या  प्रस्तावनेतील  सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही हे  3  शब्द वाचकांच्या  कायम  लक्षात  राहतील.  ही आधुनिक प्रजासत्ताकाची गुणवैशिष्ट्ये  आहेत. अशा  प्रजासत्ताकाची स्थापना  करण्यासाठी  आपण लढा दिला  आणि  आजच्या तारखेला  बरोबर  75 वर्षे  मागे  म्हणजे    15 ऑगस्ट  1947  रोजी  भारताला  स्वातंत्र्य  मिळाले.                      ...

राजकारणातील पाली.....

इमेज
राजकारणातील पाली....       राज्यात गेल्या महिन्यात नुकतच झालेलं बहुपात्री राजकीय नाटकं घडून सत्तांतर झालं.सत्तांतर आणि त्यापाठोपाठ सरकारवरील विश्वासदर्शक ठरवाकरिता झालेल्या विधानसभाअधिवेशनात सर्व काही प्रयोग झाले.त्यात कोण ,कुठे,कधी जातो हा सस्पेन्स होता, मुंबईतुन सुरत व्हाया गुवाहाटी ला पोहचनाऱ्याचं थ्रिल होतं, तरीही निष्ठावान असल्याचा ड्रॅमा होता,वेष बदलून रात्री घेतलेल्या गुप्त भेटीगाठी होत्या,विधिमंडळ च्या भाषणामध्ये राग दिसत होता,द्वेष होता,कोपरखळ्या होत्या,एकमेकांना केलेल्या रानटी गुदगुल्या होत्या ,माझे कसे सगळेच मित्र आहेत हे सांगणे होतं... सर्व काही आलबेल होत.नव्हता फक्त आपल्या सारख्या सामान्य माणूस आणि त्याचे प्रश्न!                विधांनसभेतल्या प्रत्येक निवड केलेल्या कलाकारांची भाषण ऐकतांना महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या कानाला अटॅक आला असेल हे नाकारता येत नाही.ते ऐकून हे  जाणवत होतं की महाराष्ट्राचे 12 कोटी नागरिक आणि त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचा दुरदूरचा ही आता संबंध उरलेला नस...

सौंदर्य....

जेव्हा आपण म्हणतो की सौंदर्य सर्वत्र आहे तेव्हा आपल्याला असे म्हणायचे नसते की कुरुपता हा शब्द भाषेतून नाहीसा केला पाहिजे. असे म्हणणे म्हणजे असत्य असे काही नसते असे म्हणण्याइतकेच मूर्खपणा चे ठरेल.असत्य हे खात्रीने अस्तित्वात आहेच,पण ते विश्वाच्याप्रणालीत असत नाही तर ते आपल्या आकलनाच्या क्षमतेत त्यातील नकारात्मक भाग म्हणून असते.याचं पध्दतीने आपल्याला झालेल्या सत्याच्या अर्धवट साक्षात्कारामुळें आपल्या जीवनातून व आपल्या कलातून सौन्दर्याची विकृत अभिव्यक्ती होते आणि त्यामुळे आपणास कुरुपता येते.काही प्रमाणात आपण जे आपल्यात आहे, आणि जे इतर सर्वात आहे अश्या सत्याच्या नियमांच्या विरोधात आपले जीवन मार्गस्थ करू शकतो आणि त्याचप्रमाणे सार्वत्रिक असलेल्या सुसंवादाच्या शाश्वत नियमाला उलटे फिरवत कुरुपता निर्माण करू शकतो. अमोल नंदा शिवाजी भोसले.

"बुद्ध हसत आहे".....

इमेज
            "बुद्ध हसत आहे"....  "अर्थहीन वादविवादापेक्षा  अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते".                                         - गौतम बुद्ध इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु पाहणार्‍या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक, सामाजिक, राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत, साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुसर्‍या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंद्यांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य, व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना,‘करूणा-शील-प्रज...

"आधुनिक महाराष्ट्राचा उत्तुंग हिमालय:लोकराजा राजर्षी शाहू महाराज".

इमेज
"आधुनिक महाराष्ट्राचा उत्तुंग हिमालय:लोकराजा राजर्षी शाहू महाराज". महाराष्ट्र ही संताची, राष्ट्रनायकांची, क्रांतिवीरांची, सामाजिक  झटणा-ऱ्या सुधारकांची आणि मानवतेच्या मूल्यांची स्थापना करण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची, विचारवंताची भूमी राहिलेली आहे. याच भूमीमध्ये प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली, विकसित झाली, प्रसरण पावली आणि अधोगामी विचारधाराही निपजली. प्रत्येक वेळी प्रागतिक विचारधारेची सरशीच झाली असे नव्हे; परंतु महाराष्ट्रातील जनतेने प्रागतिक विचारांना बळ देण्याचे काम केले. इतिहासाच्या पानापानांवर गर्दी करून राहिलेल्या घटनांमध्ये, सुवर्णाक्षरांनी नोंदवाव्यात अशा काही व्यक्ती व घटना आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचे एकजीव असे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला.आणि या आधुनिक महाराष्ट्राला सुंदर राजमहाल ज्या अनेक क्रांतिकारक कार्यातून झाला;  त्या अनेक शिल्पकारांपैकी एक  महत्त्वाचे नाव म्हणजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज होत. छत्रपती राजर्षी शाहूंनी ज्या काही समाजपरिवर्तनाच्या चळवळी बांधल्या, विकसित केल्या; किंबहुना त्यांना आर्थिक, रा...

हॅलो प्रीतम.....

इमेज
           Hello प्रीतम.....            ती शून्यमधली यात्रा,             वाऱ्यातील एक विराणी,              गगनात विसर्जित होता,               डोळ्यात कशाला पाणी....   प्रिय प्रीतम,                   काही काही प्रसंग बोलायला जेवढे अवघड असतात तेव्हढेच सांगायला सुद्धा जड जातात. आजच्या तारखेला बरोबर एका वर्षांपूर्वी तू आम्हांला सोडून गेलास.तुझं जाणं हे अगदी मनाला चटका लावणार, अन माझ्यासाठी धक्कादायक होतं.मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर निघून जाशील.पण काळाचे अन नियतीचे दरवाजे कधी कुणासाठी एकदम उघडतील हे ज्याच्या त्याच्या नशिबाला माहीती. तो दरवाजा कुणाच्या आयुष्यात सोनेरी सकाळ घेऊन येतो तर कुणाच्या आयुष्यात कुट्ट काळरात्र....पण तुझ्या बाबतीत दैवाचे फासे उलटे फिरले अन माझ्या लाडक्या मित्राला आमच्यापासून हिरावून घेतलं.   तशी तुझी माझी मैत्री...

"मराठी भाषा दिन आणि भाषाभ्रम"....

इमेज
    "मराठी भाषा दिन आणि भाषाभ्रम..."   सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांची आजच वाचण्यात आलेली एक सुंदर कविता आपल्या मराठी भाषेची  आपल्या सोबतची नाळ जोडते ती अशी...           "अलवार कधी तलवार कधी,             पैठणी सुबक नऊवार कधी..             जणू कस्तुरीचा दरवळ दैवी,             ती सप्तसुरावर स्वार कधी..             डोलत फडकते रायगडी,             नाचते कधी ती भीमेकाठी..            ही माझी माय मराठी.                   १९९९ मध्ये विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षें झाली.  वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीच...

*कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत...❓*

*मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती.  राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला*.   .................................... तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही.     भाषण इंग्रजीत आहे.  ती फक्त एक-दोन मिनिटेच बोलली, पण तिचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते.   त्यानंतर मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले.   *प्रश्न: तुझे नाव काय आहे?*   माझे नाव राणी आहे.  सोयामोई हे माझे कौटुंबिक नाव आहे.  मी झारखंडची रहिवासी आहे.   *अजून काही विचारायचे आहे?.* प्रेक्षकांमधून एक सडपातळ मुलगी उभी राहिली.   विचार, मुली.  "मॅडम, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप का वापरत नाही?" कलेक्टरचा चेहरा अचानक फिका पडला.  तिच्या पातळ कपाळावर घाम फुटला.  तिच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले.  श्रोते अचानक शांत झाले. तिने टेबलावरची पाण्याची बाटली उघडली आणि थोडे प्यायले.  मग तिने मुलाला बसायला इशारा केला. मग ती हळूच बोलू लागली. मुलाने गोंधळात टाकणार...

मनाचा तळ......

                                मनाचा तळ......        "एकूण मनाचा खेळ तसा खुप सुंदर असतो. कोणत्याही अवयवाच्या रुपात तो कधी सापडलाच नाही. देवाने कदाचित निर्माण केला असता तर सगळ्यांना प्राप्त झाला असता.पण मन खूपच सुंदर असतं.माणूस सारं सारं आपल्या मनांत भरत असतो. सुख दुःख, तृष्णा,संपती, चांगलं ,वाईट,वेदना आणि खंत सुद्धा.त्यामुळेच जगातलं सर्वसंपन्न, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान  असं ठिकाण म्हणजे मन.म्हणूनच आपण नेहमी म्हणत असतो की ,एकदा का माझ्या मनात आलं ना..की मी ती गोष्ट सोडतच नाही. मनांत येणं याचा असाही अर्थ होऊ शकतो की प्रचंड ऊर्जा प्राप्त करणं...प्रचंड निर्धार करणं आणि कृतीच्या पातळीवर जाणं."                                                 अमोल भोसले.

"2021: World Environment Day"

इमेज
    "The Environment & the economy are really both two sides of the same coin.If we cannot sustain the environment, we cannot sustain ourselves."                         - Wangari Ma a thai          World Environment Day is celebrated every year on June 5 globally. It is a day on which we spread awareness about the environment and the need to conserve it. Moreover, it is essential to advocate for a greener environment and conservation of nature. It is quite simple as when we conserve the environment today, the future generations will be able to lead a healthier life. We cannot be so selfish and use up all the resources for ourselves. This  Day is the perfect opportunity to make people aware of the issues we are facing and how one can contribute to saving it. Thus, it is quite important in its own way.  ...

"आतला ज्वालामुखी......"

इमेज
"आतला ज्वालामुखी "              संपूर्ण प्रयत्न केले असता यश मिळते अस आपण आजपर्यंत खूपदा ऐकत आलो.पण संपूर्ण प्रयत्न म्हणजे नेमके किती प्रयत्न हे मात्र अचूकपणे सांगितले जात नाही.अर्धवट प्रयत्न केले असता यश मिळत नाही हे ही खरंच आहे.पण आपण करीत असलेले प्रयत्न कोणत्या मर्यादेपर्यंत अपूर्ण असतात आणि कोणत्या मर्यादेनंतर पूर्ण होतात हे समजणे  म्हणजे यशाची गुरुकिल्ली सापडण्यासारखेचं आहे.     आपण इयत्ता 5 पाचवी नंतर भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलो आहेत की पृथ्वी च्या गर्भात अत्यंत तप्त असा शिलारस सदैव फिरत असतो.हा रस सतत पृथ्वी च्या पृष्ठभागावर येण्यासाठी धडपडत असतो.त्यासाठी आतून एकसारखे धक्के देत असतो.जेव्हा त्याचे प्रयत्न यशस्वी होतात तेव्हा तो ज्वालामुखीच्या रूपाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर अवतीर्ण होतो.त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेले यशस्वी रूप आपल्याला लाव्हारसाच्या रूपाने दिसते. पृथ्वीच्या आतून ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर येण्यासाठी तप्त शिलारसाची चाललेली ही धडपड प्रत्येक वेळी यशस्वी होतेच अस नाही. जे...

युगप्रवर्तक छत्रपती......

इमेज
                इतिहासाचा एक आंधळा अभिमान हा एक शाप आहे.तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे.इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे.या भूमिकेतून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे नवल नाही.महाराजांचे चरित्र चिंतन हा अनेकांच्या अभिमानाचा,जिव्हाळ्याचा विषय आहे.अनेक देशभक्त ,समाजसेवक,राजकारणी,संशोधक,आणि आपल्या सारखे जनसामान्य यांना सुद्धा महाराज प्राणप्रिय आहेत याला अपवाद नाही.300 वर्षांपूर्वी महाराजांनी देहत्याग केला तरी त्यांचा किर्तीदेह महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात अजूनही तेजाने तळपतो आहे.          छत्रपती शिवराय यांचे जीवन हे अनेकांच्या जीवनाचे विधान आहे .अनेकांचे ते स्फुर्ती स्थान आहे. या श्रीमंतयोगींचे आज स्मरण करताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.महाराजांचा इतिहास सगळ्याना अगदी तारखेनुसार पाठ आहे.महाराज जन्माला आले ते एका गडावर अन या जगाचा निरोप घेतला तो दुसऱ्या गडावर.महाराष्ट्र्याच्या गडकोटांनी महाराजांच्या आयुष्याला एक भौगोलिक अन सांस्कृतिक विचा...